
त्या मुळे भारतात हरीत
क्रांन्ती झाली.त्यापुर्वी भारतात परदेशातून धान्य आयात करायला लागायचे.आता
भारत धान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला.कालतराने भारतात श्वेत क्रांती
होउन दुधदुभते विपुल झाले.मग आज शेतक-यांची दुरवस्था का निर्माण झाली
आहे.तरीही शेतकरी आज दरिद्री.अर्धपोटी आहे. याचे खरे कारण असे की त्यांना
देऊ केलेल्या सवलती त्यांना पुर्णपणे पोहचतच नाहीत. ग्रामीण जीवणात अलीकडे
उदयाला आलेले सधन शेतक-यांचा नविन वर्ग या सुखसुविधांचा लाभ स्वत;पुरताच
करून घेतात. या मुळे सधन वर्ग अधिक सधन होत आहे.आणि सामान्य शेतकरी
अधिकाअधिक कर्जबाजारी होत आहे.शेतक-याचा अशिक्षितपणाचा फायदा गावातील
जमीनदार सावकारही घेतात. त्यामुळे शेतक-यांच्या शेतजमीनी गहाण पडलेल्या
दिसून येतात. निसर्गाचा लहरीपणा शेतक-यांना घातक ठरतो. कधी अवर्षण तर कधी
अतिवर्षाव.प्रगतीच्या काळात खेड्यातून वीज वाहु लागली. खेड्यातून एस .टी
धावू लागली.शेतक-यांच्या मुलांसाठी शाळेची सोय करणयात आली. दुरचित्रवाणी
मुळे शहरातील मोहात पाडणारे जीवन खेड्यापाड्यात दिसू लागले. शेतक-यांच्या
फायदासाठी कसेल त्याची जमीन असा कायदा करण्यात आला.पण जमीन कसण्यासाठी
पुढली पीढी अजीबात तयारच नाही. शेतकरी सुखी तर जग सुखी , असे म्हटले जाते
पण प्रत्यक्षात त्यांच्या सुखासाठीचे प्रयत्नच अपुरे पडतात.भारतात
सामर्थाच्या आधारस्तंभ असणा-या शेतक-याच्या समद्धीमळेच भारत देश
समृद्धीमुळेच भारत देश पुन्हा समृद्द होणार आहे, हे सत्य लक्षात घेऊन
शेतक-यांची परिस्थिती सुधारली पाहिजे.......
No comments:
Post a Comment